Sunday, January 2, 2022

जयंत पवार स्मृती विशेषांक- वसा दिवाळी अंक २०२१

       जयंत पवार ऑगस्ट २०२१ मध्ये गेले. वसा २०२१ चा दिवाळी अंक त्यांच्याबद्दल, त्यांच्या मरणाबद्दल आहे.
       पवारांची ऋजुता, स्वतःला ठाम भूमिका असूनही आक्रस्ताळी न होण्याची त्यांची पद्धत, आणि शेवटी मृत्यूची शक्यता विस्तारत जाऊन अटळ बाब बनतानाही त्यांचं composure ह्या बाबी काही लेखातून खूप नीट उमजतात. त्यांनी एकाला सांगितलेलं ‘now it is between doctor and my body’ हे वाक्य ते स्वतःकडे बघण्याच्या प्रक्रियेत कुठे पोचले होते हे दाखवतं.

I wish I can have this composure when I will enter the region where death is mere a formality left, but I must wait for the due process to end. मला हे माझ्यासाठी होईल तेव्हा मी काय करेन ह्यापेक्षा जेव्हा हे माझ्या जगण्याच्या सवयींच्या, प्राधान्याच्या वर्तुळात असलेल्या माणसांसाठी करायला लागेल तेव्हा कसं होईल ह्याची जास्त काळजी वाटते. असो. पवारांच्या बद्दलच्या दिवाळी अंकाचे निमित्त करून स्वतःबद्दल बोलणारा मी एकटाच तर नाही, I am in good company!
दिवाळी अंकात अनेक लेख हे बादरायण आहेत. म्हणजे ते जयंत पवारांबद्दल, त्यांच्या मरणाबाबत नाहीतच. समजा ‘अधांतर नाटकाशी संबंधित कोणी गेले असते तरी हाच लेख कमी-जास्त प्रमाणात लिहिला गेला असता असे लेख. लिहिणाऱ्याला हे दिसत नाही का कि तो आत्मलेख लिहित चाललाय आणि मेलेला माणूस केवळ एक निमित्त होऊन बसला आहे स्वतःबद्दल बोलण्याचं.
म्हणजे अशा आत्ममग्नतेला बरं-वाईट म्हणण्याची बाब नाही. कदाचित अशी आत्ममग्नता ही फारच स्वाभाविक मानवी बाब असावी. पण लिहिणारे अशा स्वाभाविक मानवी गुणधर्मांच्या पलीकडे सरकत नाहीत का? असं सरकणं हा लिहिण्याचा एक मक्सद असतो ना?
पवारांसाठी ते घडलं होतं. त्यांचे त्यांच्या मित्रांशी बोलून, whatsapp द्वारे शेवटच्या दिवसांत झालेले संवाद हे दाखवून देतात. त्यांना शक्य असतं ते अगदी सरतेशेवटी, म्हणजे असण्याची रेष ओलांडून आपण नसण्यात जातो, तेही त्यांनी लिहिलं असतं. त्यांच्या शैलीत लिहिलं असतं, ज्यांत माणसांच्या आयुष्याबद्दलचा जिव्हाळा, त्यांच्या निवडी-आवडी ह्याबाबत एक विरक्त कारुण्य आहे.
त्यांचे चळवळींशी संबंध, भूमिका ह्याबद्दल लोकांनी लिहिलं आहे. ते conservative, उजवे नव्हते किंवा अशा गटांना सहानुभूती असलेले नव्हते हे स्पष्ट आहे. पण आपल्या राजकीय-सामाजिक भूमिकांसाठी लिखाण माध्यम वापरणारे ते होते असं मला त्यांच्या कथांमधून वाटलं नाही. (मी त्यांची नाटके पाहिलेली किंवा वाचलेली नाही.) त्यांची भूमिका ही त्यांच्या लिखाणाची परिणती होती.

असो. पवार नाहीत आता, आणि त्यामुळे त्यांच्या नव्या लिखाणाची शक्यताही नाही.      

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...