Saturday, December 4, 2010

आत्महत्येच्या एका ऐकीव बातमीबाबत

सिगारेटच्या धुरात उदास संध्याकाळचा कंटाळा हलका होताना मित्राचा फोन वाजला.... फोनवर तो थोडावेळ बोलला आणि एकदम मला म्हणाला, माझ्या एका मित्राने आत्महत्या केली. माझ्या कंटाळ्यात एक मोठे भगदाड पडले, आणि मी कुतूहलाने पुढे ऐकू लागलो...
हा श्रीमंत होतं काय.... आणि इंजिनियर ...म्हणजे आमच्या ३ महिन्याच्या स्टायपेंड एवढा ह्याचा महिन्याचा पोकेटमनी... वडील प्रसिद्ध डॉक्टर , मोठा भाऊ पण डॉक्टर.... (थोडक्यात गरिबी हे मरण्याचे कारण बाद) ह्याचे एका परधर्मीय मुलीवर प्रेम होते आणि ह्याच्या आईचा लग्नाला विरोध होतं... (ऐकल्यासारखी वाटते ना गोष्ट) मागची तीन वर्षे ह्याचे आईबरोबर झगडे होत होते आणि तो नोकरीनिम्मित दुसर्या शहरात रहात होतं. मरण्यागोदर त्याचं आई आणि प्रेयसी दोघांबरोबर भांडण झालेलं. आणि मग....
त्याने गळफास लावला...खाली खुर्ची नव्हती.... आणि त्याचे पाय जमिनीला स्पर्श करत होते.... हा जेव्हा मेलेला सापडला तेव्हा त्याचे गुडघे दुमडलेले होते.... आणि शरीर निळे पडलेले ....
माझ्या मित्राच्या मते हे मरण्याचे झ्याटू कारण आहे.... त्या मुलीशी लग्न करून भांडत भांडत आईला समजावता आला असतं....
माझ्या मते आत्महत्या करणारे कायमच बरोबर असतात.... फक्त तर्काच्या दोर्या वापरून त्यांच्या बरोबर असण्याच्या मुळाशी पोचता येत नाही.... its on altogether different plain... आणि त्यांना भित्रे वगैरे म्हणणे म्हणजे जगत रहाणार्यांनी आपल्या भोंदू गांडूपणाला जोडलेली शौर्याची बेगडी शेपटी आहे.... त्यांना मरावासा वाटलं ते मेले.... जे हवं होतं ते मिळत नव्हतं हे मरण्याचं सबळ कारण आहे.... ते कधी ना कधी मिळेल किंवा त्यापेक्षा बरं मिळेल किंवा ते दुखच संपून जाईल अशा तथाकथित 'आशावादाला' चिकटून जगत राहणं कि खरंच चांगली निवड आहे का.... आता मी अजून जिवंत आहे आणि तरी असे म्हणतो आहे... मग मी मरत का नाहीये.... बरोबर आहे तुमचा प्रश्न.... त्याबद्दल नंतर कधीतरी.... आता विषय वेगळं आहे.... (सोयीस्कर!)
आता हा इसम मेल्यावर त्याच्या आईचा आणि प्रेयसीचा काय.... त्याच्या प्रेयसीने पण आत्महत्येचा प्रयत्न केला अशी ऐकीव बातमी.... पण आईचं काय....
एखादा माणूस,,, अगदी निराशावादी माणूसही आपल्यामुळे मेला आहे हे जाणवत राहून जगत राहणं हा काय प्रकार आहे....
आता कदाचित ह्या इसमाचे लग्न झाल्यावर त्याने एक वर्षात घटस्फोट घेतला असतं... किंवा त्याच्या बायकोने आत्महत्या केली असती.... किंवा ह्या माणसाला मुळाशीच काही पोकळपणा असणार... म्हणून त्याने आई-बाई अशा शुल्लक प्रकाराने आत्महत्या केली.... किंवा प्रेमात पडल्याने आणि उभं न रहाता आल्याने....
आम्ही दोघं त्या मृत इसमाचे सहानुभूतीदार आहोत का तटस्थ निरीक्षक.... जे एकूणच ह्या मृत्युच्या तात्विक पार्श्वभूमीचे विश्लेषण करत आहेत....
त्याला मरण्याच्या शेवटाच्या काही क्षणात काय वाटलं असेल.... कारण खुर्ची वापरून गळफास हा तुलनेने मरण्याचा कमी त्रासदायक प्रकार आहे... मणका तुटतो... आणि खल्लास... (मित्राकडून आलेली माहिती) ...आता इथे हा लटकत होता... प्रयत्नपूर्वक गुडघे दुमडत असणार.... पण मग तो आधी बेशुद्ध झाला आणि हळूहळू ... का मरेपर्यंत त्याने गुडघे टेकलेच नाहीत...मरणासमोर.... का काळा-निळा पडण्याच्या शेवटच्या क्षणात जगण्याच्या इच्छेचा डोंब उसळून आला आणि तिथे कोणी नव्हतंच.... त्या मुलीला कधी कळलं नाही कि हा असा टोकाला जाऊ शकतो.... का असे टोकाला जाऊ शकतो वाटणारे कुठे जाणारे नसतातच....जे जातात ते असे झटकन....
त्याला हे का कळलं नाही कि प्रेम ही भावना हळूहळू विरत जाईल आणि सोयीस्कर तडजोडीने तो समाधानाचा घरगुती अंगरखा पांघरू शकेल....
शक्यतांच्या जाळ्यात न येणारी घटना एवढंच म्हणून हा 'इवेन्ट' सोडून द्यावा लागेल का.... मेळघाटात माणसे जगतात, हजारो किलोमीटर अंतर तोडत जगण्याची नवी मुळे पकडतात, बकाल दारिद्र्यात जगतात, एकवेळचे जेवण खाऊन जगतात.... म्हणजे ऑन एवेरेज माणसाच्या जगण्याचा आशेचा तंतू प्रबळ असताना हा असा का..... किंवा बाकीचे असे का..... अख्या भारतात मागच्या वर्षी असे ३७००० आहेत.... कोट्यावधींच्या जगण्यात, जे दरवर्षी ९%ने समृद्ध (!) होते आहे त्यात हे उदास जीव का....
जे हवं आणि जे आहे यांच्या मधलं अंतर कधी कधी इतकं न संपणारं का असतं....
त्याच्या आणि त्यांच्या आत्महत्येनंतर माझे हे वांझोटे प्रश्न....

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...