Thursday, June 24, 2010

केव्हातरी

एकमेकांना ऐकवत होतो थेंबांचे आवाज
तुझ्या माझ्यातल्या अंतरात पावसाची धून होती
केव्हातरी तो थांबणार होताच बरसायचा
केव्हातरी ओल्या मातीतल्या खुणा पुसायाच्याच होत्या

पेलवणार नाही जगण्याला एवढं स्वप्नांचं ओझं
पायांनी केव्हाच स्वीकारलेलं अधांतर
केव्हातरी मौन गाठणार शब्दांना
केव्हातरी कवितांना मनातच थांबवायचे होते

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...