तुला विसरण्याची अटळ प्रक्रिया सुरू झालीये, बहारानंतर येणारी पानगळ. आता हे वठत चालेल्या झाडावरचे शेवटचे पक्षी. स्थित्यंतराचे भोग हे असेच, आणि म्हणून हे कळून उमजून स्वीकारलेले मौन तुझ्या माझ्यात.
पण शेवट व्हायचा, तर तो खोल असावा, थांग न येणारा. एकमेकांना कुरतडत असा एकमेकांना जखमी करून आपण आठवणींच्या मोरापिसानाही वार्यावर उधळून दिला. तुझं विचार करताना मनाचं निब्बर होणं डाचत राहता. इतके खोल व्रण सोडले मधल्या काळाने आपल्यावर. तरीही आता परत संवादाचे पूल उभे करावेत आणि येणाऱ्या वादळाची वाट पहावी इतकी उभारी राहिलेली नाही. हि शांतताच अखंड राहूदे, आणि तुझ्या आठवणीची वळलेली पानं उडून जावोत ह्या रिकाम्या होत चालेल्या अंगणातून आणि काही सुकलेली फुलं उरोत कवितांच्या पानात, विसरून गेलेली.
Sunday, April 25, 2010
आजचे मरण उद्यावर ढकलले
आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...
-
मागच्या वर्षी कधी वर्तमानपत्रात, कधी फेसबुकवर मी ‘हंडाभर चांदण्या’ बद्दल वाचलं होतं. मग केवळ १०० रुपये तिकिटात आपल्या शहरातील नाट...
-
तिथे जे डोंगर आहेत तिथे आपल्याला जायचं आहे, ते डोंगर, ज्यांच्या अस्तित्वाच्या रेषा दिसतायेत धुकट धुकट, तिथे. तू.सोबत चाल किंवा एकटा आपापला ...
-
अनंतचतुर्दशीला घरात बसून धातुकी कंपने अनुभवताना मी हे विचार सुरु केले. मनोरंजन किंवा closure हेच त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे, पण झालाच त...