Tuesday, April 20, 2010

बराच गोंधळ आहे, आणि त्यातच स्वतःला कशावर तर केंद्रित करण्याचे निष्फळ प्रयत्न चालू आहेत. मुळात हे असं केंद्रित होणं अगदी बरोबर असं काहीतरी बिम्बवलेलाच असतं कदाचित मनावर. पण तसं असल्याने निर्णय घेणं बराच सोपं होतं असही मी शिकलो आहे आता. पण असं उगाच जगाच्या प्रश्नात स्वताची अमूर्त models बनवत राहणं ही एक वेळखाऊ गोष्ट आहे असं मला वाटतंय. अर्थात स्वप्नं चितारायची बरीच सवय असली कि मोडेल बनवणं फारसा कठीण जात नसावा. पण स्वताच्या मनातल्या अमूर्ततेला आकार देण्यासाठी इतरांनी काय काय करून ठेवलाय हेही पाहून ठेवावं लागता, आणि ते नक्कीच कंटाळवाणा आहे.
ब्लोग वाचत होतो बरेच मराठी. मला असं जाणवतंय के आता लिहिणारे बरेच जण अमेरिकेत बसूनच लिहितायेत. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा आवाका फारच रून्दावलेला आहे. संदर्भ बरेच सखोल आहेत, लिहायच्या प्रेरणा ठोकळेबाज नाहीत आणि जगाच्या पसार्याला शब्दांच्या नक्षीत उमटवायचा निर्धारही जोरदार आहे.
आपलंच आपल्यात इतके शब्द असतात ना, तुला लिहिताना थोडेफारच उमटात असावेत त्यातले. आता सध्या जरा पोटापाण्याचे प्रश्न सतावू लागलेत आहेत, आणि जे शिक्षण चाल्लय त्यातून सहीसलामत पास होणं अशी दुहेरी जबाबदारी येऊन पडली आहे. पण म्हणून काही अगदी मेहेनत करू लागलो आहे असं नाही. असं काय हा जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे कि उगाच सतत तेच करत बस. म्हणजे घरी गेल्यावर वगेरे वाटतं कि आता थोडा जबाबदार वगेरे व्हायला हवा. पण ते तेवढ्यापुरता.
लिहायचं काय, आणि लिहितोय काय. तर रांगत बसण्याचा आलाय कंटाळा. स्वताच्य असण्यालाच आव्हान देऊन पहिला पाहिजे, म्हणजे खांद्यावर पोतडी टाकून भटकत राहणं, गावात वगेरे जाऊन संथ जीवनाचे कंटाळवाणे मुलुख तुडवणं, किंवा स्वतःची अमूर्त दुनिया बनवणं ज्यात आपणच खेळ खेळायचे. पण म्हणजे काय, तर स्वतःला आवडणारं काम शोधणं हा शोध आता स्वतःला कमीत कमी कंटाळवाणं काम शोधणं असा बनला आहे. आहे कि नाही गम्मत.
मध्ये मध्ये शब्दांच्या प्रवाहात ओढला जातो. मग उगाच अजून जे भोगलं नाही त्या प्रतिमा, त्यांची ओढ, तुझ्या असण्यापासून असून नसण्यापर्यान्ताचे माझ्याच मनात उमटलेले तरंग, किंवा आधीच्याच कोणाच्या शब्दांचा अजून मानेवरून न उतरलेला भूत.
तुला हे सगळे माझे इतके रंग वाटतात का? काही दिवसांनी तू यालाच भिरभिरलेपण म्हणशील. खूप भूमिका करण्यार्या नटाचा खरं स्वभाव कसा असावा हे उलगडण कसा गुंतागुंतीचा असेल ना?
काय लिहू, उगाच नादावालोय. आठवणी पण नाही यात नाहीयेत ना येणाऱ्या दिवसांची कोवळी उत्सुकता. बस या क्षणांशी निवांत स्थिरावलो आहे, कुठेतरी लांबवर राहून गेलेल्यागावाचं चित्र मनात उमटतंय...
ही सार्या शब्दांना दुखाची किनार का आहे ग? हा माझ्या शब्दांचा नक्षत्रयोग म्हणायचा का माझे हात दुखाची काळीशार गर्ता चाचपता चाचपता त्यातच हरवून गेलेत.
येशील तेव्हा एक शांत संध्याकाळ घेऊन ये, जिच टोक मावळतीच्या किरणांपासून खूप दूर असेल.

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...