कधी वाटतं तू असावस जवळपास
माझ्य संदर्भाना असावं तुझं अधोरेखन
कधी वाटता बर हेच बैरागिपण,
का जीवाला उगाच आस
उगाच शब्दाना शब्द जोड़णे नाही,
आज हृदयाची कळ आणि उदया पायातले लोढणे नाही॥
आज वाटेल सुटला
पण उदया पेचात पकडेल असा गुंता
उगाच वाट पहायला नको
चालीन रस्ता आपल्यापुरता
दिला आहेस तेवढा
आठवणींचा शेला विणेन
येतील जेव्हा कढ अनावर
सवयीने त्यानाच सुख म्हणेन
स्वीकारलेल्या मौनामध्ये
काही घुसमटलेल्या संध्याकाळी
दिवस सोडून जातो अधांतरी
रात्रही नवथर अशा कातरवेळी
अशावेळी आठवेन शब्द आपलेच
जे सुटले पाठी
पेरून उजाडलेली स्वप्ने
अणि काही न सुटलेल्या गाठी
मस्त रहावा दुःखात आपल्या
जोखावं आपल्याला, चाखावं जग पुरेपुर
का उगाच आशांची पेरणी
मग न फुलण्याची हूरहूर
शब्द आले, बनले, गेले
दिवसांचे कापूर जळून खाक
ओसंडून भोवंडले विचार
खरडून आला पाठीला बाक
आता असेच अधून मधून
आपलेच शब्द चालीत जाणे
आता असेच अधून मधून
स्मरणे जुने हळवे गाणे
तुझ्यसाठी सोडून जातो
या कवितेच्या पाउलखुणा
शोधशील तर सापडेनही मी
फ़क्त राहिलो नसेन जुना
आजचे मरण उद्यावर ढकलले
आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...
-
मागच्या वर्षी कधी वर्तमानपत्रात, कधी फेसबुकवर मी ‘हंडाभर चांदण्या’ बद्दल वाचलं होतं. मग केवळ १०० रुपये तिकिटात आपल्या शहरातील नाट...
-
तिथे जे डोंगर आहेत तिथे आपल्याला जायचं आहे, ते डोंगर, ज्यांच्या अस्तित्वाच्या रेषा दिसतायेत धुकट धुकट, तिथे. तू.सोबत चाल किंवा एकटा आपापला ...
-
अनंतचतुर्दशीला घरात बसून धातुकी कंपने अनुभवताना मी हे विचार सुरु केले. मनोरंजन किंवा closure हेच त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे, पण झालाच त...