माझीच माझ्याशी ओळख पटत नसते तेव्हा....
जे जगत आलो ते पुढे जगवत नाही अणि
नव्या जगण्याची आस धरवत नाही तेव्हा....
कालासिद्ध चौकट जाचत असते खरी पण
स्वतःची चौकट उभारावी ही उभारीही येत नाही तेव्हा....
येणारा प्रत्येक दिवस ओझे वाटायला लागतो,
अणि जाणारी प्रत्येक रात्र हळहळत जाते तेव्हा....
तत्वज्ञान अणि अद्धयात्माच्या पांघरुणातही भोगाची तळमळ जाळत जाते तेव्हा....
अणि जगण्याचे सारे दरवाजे उघडले तरीही
एकही गात्र रसरसुन येत नाही तेव्हा....
अर्थाचे गुंते अणि त्यात कोळ्याच्या जाळ्यासारखे फ़सणं
हेच प्राक्तन असतं तेव्हा....
कृतीचा निर्व्याज आनंद,
परीणामांच्या संभाव्यतेत नासतो तेव्हा...
तेव्हा तरी,
तू नवे प्रश्न ठेवू नयेस माझ्य पदरात।
माझ्य भाळिचे पश्नाचिन्हांचे गोंदण तर तू पुसणार नाहीस,
पण तुझ्य शंकांचे खिळे तरी माझ्य क्रूसात रोवू नयेस।
जगण्याच्या प्रश्नावर्तात माझी पडझड होताना,
तुझ्य आठवणी मोरपीसांच्या रहाव्यात,
त्यांचे व्रण होवू नयेत....
Wednesday, November 18, 2009
हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता
उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...
-
उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...
-
मागच्या वर्षी कधी वर्तमानपत्रात, कधी फेसबुकवर मी ‘हंडाभर चांदण्या’ बद्दल वाचलं होतं. मग केवळ १०० रुपये तिकिटात आपल्या शहरातील नाट...
-
आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...