Friday, November 13, 2009

कुणाच्याही संदर्भाने लिहू नये कविता
मग कवितेला त्या संदर्भाच्या अस्तित्वाची चटकच लागून जाते।
कविता भोगावी आपलीच आपल्यात,
जसे विराण रात्रींचे बोचरे एकटेपण।
रित्या आयु्ष्याचेही असते ,
जसे एक निनावी भरलेपण।
कागदावर न उमटलेल्या शब्दांचेही असते एक गाव,
कोणालाच न सांगावे असेही मनात असते एक नाव।
अर्थाचिही अटळ अट असू नये गाण्याला,
तालाचा आग्रह नसावा अनावर शब्दांना
कविताच असावी,
आनंदाचा उत्सव,
आणि दुखान्त मरणाची कळ।
सापडलाच कोणी जर श्वासांच्या परिघात
तर ऐकवावे त्याला गाणे,
नाहीतर आपल्याच चालत्या पायात वीणावि
कवितेची काळीजधून।
कवितेला देऊ नये ,
कुठल्याच अस्तित्वाचा भरजरी पण फाटका पदर।
बस्, इमान राखाव शब्दांशी,
भले तेही आपले नसोत.....

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...