कुणाच्याही संदर्भाने लिहू नये कविता
मग कवितेला त्या संदर्भाच्या अस्तित्वाची चटकच लागून जाते।
कविता भोगावी आपलीच आपल्यात,
जसे विराण रात्रींचे बोचरे एकटेपण।
रित्या आयु्ष्याचेही असते ,
जसे एक निनावी भरलेपण।
कागदावर न उमटलेल्या शब्दांचेही असते एक गाव,
कोणालाच न सांगावे असेही मनात असते एक नाव।
अर्थाचिही अटळ अट असू नये गाण्याला,
तालाचा आग्रह नसावा अनावर शब्दांना
कविताच असावी,
आनंदाचा उत्सव,
आणि दुखान्त मरणाची कळ।
सापडलाच कोणी जर श्वासांच्या परिघात
तर ऐकवावे त्याला गाणे,
नाहीतर आपल्याच चालत्या पायात वीणावि
कवितेची काळीजधून।
कवितेला देऊ नये ,
कुठल्याच अस्तित्वाचा भरजरी पण फाटका पदर।
बस्, इमान राखाव शब्दांशी,
भले तेही आपले नसोत.....
Friday, November 13, 2009
हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता
उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...
-
उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...
-
मागच्या वर्षी कधी वर्तमानपत्रात, कधी फेसबुकवर मी ‘हंडाभर चांदण्या’ बद्दल वाचलं होतं. मग केवळ १०० रुपये तिकिटात आपल्या शहरातील नाट...
-
आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...